" माझे बाईपण "...................




कवयित्री पदमा गोळे यांची एक कविता वाचनात आली....! "आजच्या इतकी आईपणाची भीती वाटली नव्हती. अगतिकतेची खंत कधीच दाटली नव्हती" ....!  कवितेतील या काही ओळी वाचताना आजही  स्री आणि तिची भीती यांचा संदर्भ बदललेला नाही ....! दिल्लीतील आणि त्यानंतर सातत्याने स्रीयांवरील अत्याचारांच्या घटना आपण वाचतोच आहोत.  ज्या स्रीयांवर  हे अमानुष अत्याचार झालेत त्यांच्या दुख:वेदनांशी आपण कल्पनेतही भिडू शकत नाही....! आपला सामाज स्रीयांबाबत एव्हढा असंदेनशील कसा राहू शकतो?
अनादी -अनंत काळापासून कधी द्रौपदीच्या रुपात विटंबना तर कधी सीतेच्या  रुपात स्री पवित्र्याच्या सत्वपरीक्षेचे आव्हान अश्या    विकृत समाजपुरुषाच्या   मानसिकतेचे स्वरूप पहायला मिळते ....! आणि आजही हि विकृत समाजपुरुषाची  मानसिकता बदलेली नाही ..!
स्री पुरुष विषमता हा एक व्यापक विषमतेच्या वास्तवा मधला सर्वव्यापी घटक आहे. यापलीकडे विषमता पेरणारे घटक आहेतच धर्म , जात शिक्षण पैसा असे अनेकविध घटक आहेत. आणि प्रत्येक घटकातहि आपल्या परीने आहे रे नाही रे , थोडे वरचे  आणि थोडे खालचे स्तर आहेत या प्रत्येक स्तरावर स्रीयाना संघर्ष करावाच लागतो....! स्री  दुर्बल आहे...! असे फक्त समाजपुरुष ओरडतो ...! आजची स्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुषी मक्तेदारी असलेल्याही प्रत्येक क्षेत्रात  कार्यरत आहे...!  परंतु तरीही स्रियांचा त्यांच्या मतांचा , त्यांच्या विचारांचा एकूणच त्यांच्या अस्तित्वाचा किती विचार केला जातो....? 
आजच्या २१ व्या शतकातही स्रीयांपुढे  स्रीभ्रून हत्या ,हुंडाबळी, लैंगिक शोषण, घरात- बाहेर मानसिक,शाररीक अत्याचार या आणि अश्या अनेक समस्या उभ्या आहेत...! ग्रामीण भागातील स्री तर आपल्या हक्कांबाबत अनभिज्ञ आहे . कर्त्या पुरुषाच्या बरोबरीने ती कष्ट करते पण तरीही तिला आर्थिक स्वातंत्र्य नाही...! निर्णय स्वातंत्र्य नाही...! तिला तिच्या मुलभूत गरजापासून वंचित ठेवले जाते..!

हि परिस्थिती बदलणे गरजेचे आहे....! या साठी सनातन भारतीय संस्कृतीचे पालक सांगतील मग स्रियांनी ७ च्या आत घरात यावे...! पूर्ण  कपडे घालावेत..! फक्त चूल आणि मुल सांभाळावे......! तर हे सर्व थोतांड आहे.....! बलात्कार करताना ती लहान मुलगी आहे कि म्हातारी स्री  आहे  हे बघितले  जाते का ...? तिचे वय ...तिचे कपडे या नगण्य गोष्टी आहेत..!  तिचे फक्त बाईपण बघितले  जाते ...! तेंव्हा  कुठे जाते तुमचे संस्कृती..? 
 मुळात संपूर्ण समाज्पुरुशाची विकृत मानसिकताच बदलली पाहिजे. स्रीला माणूस म्हणून वागवा ..! बरोबरीने तिचा सन्मान करा ...! कारण स्री -पुरुष हे समाजाची केवळ दोन चाके नाहीत , तर निसर्गाची दोन सूत्र आहेत ज्यावर समस्त मनुष्यजातीचे अस्तित्व अवलंबून आहे...!  आणि याचे भान समाजपुरुषाला येणे आवश्यक आहे...! विकृत समाजापेक्षा सुसंस्कृत समाज निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी पाश्च्चात्य संस्कृतीच्या नावाने जे अंधानुकरण चालले आहे या
बाबत ओरड होते.. हे काहींअंशी खरे असले तरी आपली भारतीय संस्कृतीचे डोळस भान ठेवून पुरुषी मानसिकता आणि त्याहूनही विकृत मानसिकता बदलली पाहिजे....! 

माझं  बाईपण बघा ...
पण 
मी जोजविते विश्वाला ....
माझं आईपणही बघा ....!!!! 


                                               "समिधा" 

" गुंतता ह्रदय हे " ......!!

    
                                     


      काही माणसांना आपण आपल्या आयुष्यात खुप महत्व देतो   . त्यावेळी आपण हे असे का करतो   ….? ही माणसे आपण आपली मानतो , कारण आपल्याला स्वत:ला कुठेतरी हे जाणवत असते , कधी कधी त्याचा प्रत्ययही घडलेला असतो की आपल्या आयुष्यात त्याना जेवढे महत्व आहे तेवढेच मलाही त्या व्यक्तिच्या आयुष्यात महत्व आहे   . मग आपल्यातील हे आपलेपण त्या व्यक्तीला अनेक त-हानि पटवून देतो  अगदी प्रामाणिकपणे  .  सुरवातीला आपली ह्या प्रमानिकतेबाबत त्या व्यक्तिकडूनही तितकाच आणि तसाच प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा नसतेच ….! पण ही अवस्था फार काळ नाही टिकत   …!

     कारण ह्या आपलेपणाचा हळुहळु आपल्या नकळत एक मानसिक गुंता होंत  जातो  . हळुहळु आपण आपलेपण त्या व्यक्तीवर ठसविण्याच्या प्रयत्नात लादण्याचा प्रयत्न होंत जातो  .  सुरवातीला त्या व्यक्तिकडूनही आपल्याला प्रतिसाद मिळतो अगदी तेव्हढ़य़ाच उर्मितुन आणि ऒढीतुन पण जसे "अति परिचयात अवदन्या"  अश्या तर्हेने या अति आपुलकीने , ओढाळ  मनाला कुठेतरी शह बसतो आणि ती  ओढ हळुहळु खूंटत जाते   ! हे खूंटणे त्यावेळी एकाचवेळी दोघांच्याही किंवा एकावेळी एकाच्याच लक्षात येते त्यावेळी त्यांच्यातील आपलेपण कुठेतरी थरथरते आणि मग ते तुटक तुटक होते व् नंतर कदाचित ते कायमचे लोप पावते  …!!

    असे घडण्याची दोन  कारणे असू शकतात एक म्हणजे हे आपलेपण  नेमक्या त्या क्षणी पालवी धरते ज्याक्षणी कोरड्या मनाला कुठूनतरी ओलावा लाभतो  ….!  पण पुढे हीच पालवी म्रुगजळाने  आभासाने फुललेली असते असे लक्षात येते  ….!

     आणि दुसरे म्हणजे ज्यावेळि प्रेम-जिव्हाळा , आपुलकी आपला हक्क सांगू लागते त्यावेळी जबाबदारिचा  विसर पडलेला असतो  .   त्याचवेळी दोनही व्यक्तिमधील अहं सदैव जागा असेल तर तो या आपुलकिच्या हक्काने आधिक जोपासला जातो  आणि त्यामुळे तो अहं अधिक दाट , गडद , गहिरा , ठळक  होउन ज्या आपुलकीने त्याना जवळ आणलेले असते त्याचाच  नाश करत  जाते  …!! आणि गैरसमजाना अधिक पेव फूटते  ….!  असा हा गुंता /तेढा  वाढत गेला की मग नात्याचा आपोआपच अंत होतो   ….!  


                                                                                               " समिधा "












                                                                                                                        



     


"वळण"

                                        
     इतर प्राणीमात्रांपेक्षा माणूस प्राण्याचं सगळच वेगळ -आगळ असतं  .  जगण्याच्या प्रवासात चढ़ उतार येतात आणि वळण  आले की वळावेही लागते  . अश्यावेळी मागचं विसरून  समोरच्याला जाऊन भिड़ावं लागतं   …. !  आता माणसांमध्ये स्त्री -पुरुष ह्या नैसर्गीक भेदांमध्येहीं एक आगळेपण दिसते  . वळनांची ची ज्यावेळी आपण चर्चा करतो  त्यावेळि ही चर्चा स्त्रियांच्या जीवनप्रवासाचा विचार करता अधिक चिंतनीय तर होइलच पण खात्रीने करमणुकिचेही ठरेल  .   

     स्त्रीच्या जीवनात अनेक वळनं  येतात  .  पहिलेच वळण तिच्या जन्माबरोबरच येते  . तिच्या आईच्या जीवनात  .  (ती ही एक स्त्रीच) कारण मुलगी जन्माला येणे म्हणजे जिची सर्वाना  जबाबदारी उचलायची आहे … ! आणि मुलाचा जन्म म्हणजे जो सर्वांची जबाबदारी उचलतो (वंशाचा दिवा )   …! अश्या  सामाजिक धारणेत तिचा जन्म होतो आणि तिच्या पूर्ण जीवन प्रवासाची वळनं तिथेच निश्चत होतात  …!

     आई , बहिण, मुलगी अश्या नात्यांच्या गुंत्यातिल वळनांवर चालताना तिला त्यांच्याच प्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वाचा आकार उकार घडवावा लागतो  .  (तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडविण्यासाठीही तिला पिता,बंधू  अथवा पति यां सारख्या पुरुष सत्ताक सामाजिक रचनेच्या चौकटीत  राहून घडवावे लागते ) . 

     सर्वात मोठे वळण तिचे लग्न होते तेंव्हा   …. माहेरी या स्त्रीचे एक वेगळे व्यक्तिमत्व तयार झालेले असते  . ज्यावर तेथील माणूस प्रक्रुतिंचे प्रभाव पडलेले असतात  आणि लग्नानंतर पूर्णत: वेगळ्या वातावरणात. निराळ्या माणूसप्रक्रुतिच्या माणसामध्ये तिला स्वत:ला सामावून घेणे आवश्यक असते.  या सामावन्यात प्रयत्न एकतर्फी ठरतात तर  कधी अपुरे पडतात आणि मग अश्यावेळि संघर्ष निर्माण होउ शकतात   . आणि हे सर्वात धोकादायक वळण आहे.  या वळणावर तिला आघात होउ शकतो, अनेक ठेचा लागू शकतात  …!

     ज्या वळनावर तिला स्वत:च्या स्वत्वाला विसरून दुस-याना आपले मानलेले असते  अश्याच्या सोबतीने (जिथे फक्त विश्वासबळावर ती स्वत:ला सोपवित असते /झोकुन देते   ….!) आपल्या जिवनाचे पुढचे वळण कोणतेही असेल तरी आपण आता एकटे  नाही या विश्वासावर ती निर्धास्तपणे जगण्यास सीध्द होते. … !!

     अश्या ह्या पदोपदी वळण घेत चालना-या स्त्रीला समाज नेहमीच मुलीला चांगलं "वळण"   असावं असा आग्रह धरीत असतो  …! (समाजपुरूषाला अजुन कोणत्या चांगल्या वळनांची आवश्यकता वाटते …?) स्त्रीकडून समाजाला खुप अपेक्षा आहेत  … ! पण सर्व अपेक्षाच्या केंद्र स्थानी फक्त पुरुषसत्ताक प्रवृतिला पोषक असे तिचे वळन  पाहिजे.!

     अशी वळणा वळणाच्या गुंत्यात अडकलेली स्त्री म्हणुनच एक आगळे  -वेगळे    सदैव दुभंगलेले  व्यक्तिमत्व  आहे असे वाटते  ….! 


                                                                                                                "समिधा" 
     
     

     

आजचा समाज कुठे चालला आहे …. ?

    

                            


     आजचा समाज कुठे चालला आहे  …. ? जुन्या पारंपारिक नितिमुल्याना चिकटून बसलेला समाज आजच्या यंत्रयुगात माणसाच्या मनात संघर्षच निर्माण करीत आहे  .  माणसाचा माणसावरचा विश्वास उडत चालला आहे  . भोगवादाच्या आणि वासनेच्या नशेचं प्रमाण वाढत आहे   . जुनी नैतिक मूल्य जोपासली जात नाहीत  .  पैशाला अवास्तव महत्व आल्यानं कुठल्याही नितिमुल्यांची चाड  न बाळगता तो मिळवण्याच्या मागे माणूस धावत आहे  . भावभावनांनाही बाजारी स्वरुप   येत आहे की काय असं वाटत आहे  .  

     यंत्राला मन  नसतं , अगदी संगनकावरही हुकूमत चालते ती माणसाची  .  जो पर्यन्त माणसाच्या मनाची जागा यंत्र घेऊ शकत नाही तोपर्यन्त माणसाची मन:शक्ति सर्वश्रेष्ठच राहणार  .   म्हणुनच मला वाटते की माणसाच्या प्रेमभावना , वात्सल्यभावना आणि स्नेह्भावना जपनं आवश्यक आहे  .  या भावनांचे  बंध  गुंफणारी  नवी मूल्य आणि त्यावर आधारलेला समाज व कुटुंबव्यवस्था निर्माण करणे अधिक निकोपपणाचे ठरेल  असे वाटते  …! 


                                                                                                                   " समिधा "
     
     
     

"जन्मलेल्या प्रत्येकाला " ................!!



एखाद्याचा जन्म दुस-या जन्माशी बांधलेला असतो तेंव्हा आईच्या उदरातुन जुळि भावंड जन्माला येतात …!
पुढ़ेही ती मानसिक रित्या अशिच जुळलेलि रहातात की नाही हा प्रश्न क़ाळाकडेच सोपविणे ईष्ट  …!

    काल घरी परतताना गाडीतिल चर्चेतुन समजले की ठाण्याला कामाला जाणा-या  एका २० -२१  वर्षाचा मुलगा गाडीतून वाकल्यामुळे बाहेरचा खांब लागुन पडला …. आणि त्याच वेळी लेडिज डब्यात बसलेल्या त्याच्या मैत्रीणीने गाडीतून उडी मारली …! (कदाचित ते एकमेकाना पहाण्याचा प्रयत्न करीत असावेत )आणि अश्याप्रकारे एक प्रेमकहानी संपली  …!! तिचा शेवट असा व्हावा  …?

     कालच मी प्रीया तेंडूकरांचे "जन्मलेल्या प्रत्येकाला " या पुस्तकातील "एकेका कथेचे एकेक शेवट " ही ललित लघुकथा वाचली  . प्रत्येक माणूस हा स्वतंत्र कथाबिज घेउन जन्माला येतो त्याचे आयुष्य एक त्याच्याही नकळत ओघात ओघवती घडत जाणारी कथा असते   …. ! तो त्याच्या कथेचि सुरुवात त्याच्या मर्जिप्रमाणे करतो … !(खरे तर या बाबत मतमतांतरे असू शकतात )पण त्या कथेचा शेवट अपेक्षेपेक्षा वेगळाच घडतो  ….!

   काल मी एकलेल्या घटनेतील प्रेमी  …. त्यांची ती "कथा "   'तो'  आणि 'ती ' दोघानी जन्म एकावेळि घेतला नाही  .  पण त्यांच्या प्रेमाची सुरुवात त्यांच्या मर्जिने झाली असेल , त्यांचे असणे एकमेकांसाठीच होते  . त्यानी कितीतरी एकत्र स्वप्ने पहिली असतील , त्यांचा जन्म विभक्त होता पण त्यांचे  जुळणे  मात्र "मृत्युच्या बिन्दुला येउन मिळाले होते  ….!

    त्या दोघांच्या  मिलनाची  " सम"  त्यांच्या एकाचवेळीच्या मृत्युपाशी  लागली  ….! ती "एकवेळ " त्यांच्या मिलनाची "मात्रा " होती …!!  त्यांचे जीवनगाणे /युगुलगाणे या पहिल्या मात्रेपाशीच संपावे  का  ….? त्यांच्या प्रेमकहाणीचा हाच शेवट  ….?  गाण्याच्या समेलाच दोघां गाना-यानी उडून जावे …? आणि हा त्यांच्या कथेचा शेवट  त्यानाही ठाउक नव्हता …!

     जन्मलेल्या प्रत्येकालाच आपल्या कथेचा शेवट  माहीत नसतो …! जन्मलेल्या प्रत्येकासाठी स्वत:चेच जीवन एक  "गूढ़ "कथा असते  …… ! आणि आपण जगत असतो म्हणजे काय करीत  असतो  …? आपल्याच जीवनाचे "गूढ़" उकलत असतो   …! पण या बाबत आपण अनभिद्न्य असतो  …. ! आणि या अद्न्यानातच सुख असते  ! आणि म्हाणुनच जीवन "सुन्दर आहे "  ….!!!!


                                                                                                                    "समिधा"


लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......