"वळण"

                                        
     इतर प्राणीमात्रांपेक्षा माणूस प्राण्याचं सगळच वेगळ -आगळ असतं  .  जगण्याच्या प्रवासात चढ़ उतार येतात आणि वळण  आले की वळावेही लागते  . अश्यावेळी मागचं विसरून  समोरच्याला जाऊन भिड़ावं लागतं   …. !  आता माणसांमध्ये स्त्री -पुरुष ह्या नैसर्गीक भेदांमध्येहीं एक आगळेपण दिसते  . वळनांची ची ज्यावेळी आपण चर्चा करतो  त्यावेळि ही चर्चा स्त्रियांच्या जीवनप्रवासाचा विचार करता अधिक चिंतनीय तर होइलच पण खात्रीने करमणुकिचेही ठरेल  .   

     स्त्रीच्या जीवनात अनेक वळनं  येतात  .  पहिलेच वळण तिच्या जन्माबरोबरच येते  . तिच्या आईच्या जीवनात  .  (ती ही एक स्त्रीच) कारण मुलगी जन्माला येणे म्हणजे जिची सर्वाना  जबाबदारी उचलायची आहे … ! आणि मुलाचा जन्म म्हणजे जो सर्वांची जबाबदारी उचलतो (वंशाचा दिवा )   …! अश्या  सामाजिक धारणेत तिचा जन्म होतो आणि तिच्या पूर्ण जीवन प्रवासाची वळनं तिथेच निश्चत होतात  …!

     आई , बहिण, मुलगी अश्या नात्यांच्या गुंत्यातिल वळनांवर चालताना तिला त्यांच्याच प्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वाचा आकार उकार घडवावा लागतो  .  (तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडविण्यासाठीही तिला पिता,बंधू  अथवा पति यां सारख्या पुरुष सत्ताक सामाजिक रचनेच्या चौकटीत  राहून घडवावे लागते ) . 

     सर्वात मोठे वळण तिचे लग्न होते तेंव्हा   …. माहेरी या स्त्रीचे एक वेगळे व्यक्तिमत्व तयार झालेले असते  . ज्यावर तेथील माणूस प्रक्रुतिंचे प्रभाव पडलेले असतात  आणि लग्नानंतर पूर्णत: वेगळ्या वातावरणात. निराळ्या माणूसप्रक्रुतिच्या माणसामध्ये तिला स्वत:ला सामावून घेणे आवश्यक असते.  या सामावन्यात प्रयत्न एकतर्फी ठरतात तर  कधी अपुरे पडतात आणि मग अश्यावेळि संघर्ष निर्माण होउ शकतात   . आणि हे सर्वात धोकादायक वळण आहे.  या वळणावर तिला आघात होउ शकतो, अनेक ठेचा लागू शकतात  …!

     ज्या वळनावर तिला स्वत:च्या स्वत्वाला विसरून दुस-याना आपले मानलेले असते  अश्याच्या सोबतीने (जिथे फक्त विश्वासबळावर ती स्वत:ला सोपवित असते /झोकुन देते   ….!) आपल्या जिवनाचे पुढचे वळण कोणतेही असेल तरी आपण आता एकटे  नाही या विश्वासावर ती निर्धास्तपणे जगण्यास सीध्द होते. … !!

     अश्या ह्या पदोपदी वळण घेत चालना-या स्त्रीला समाज नेहमीच मुलीला चांगलं "वळण"   असावं असा आग्रह धरीत असतो  …! (समाजपुरूषाला अजुन कोणत्या चांगल्या वळनांची आवश्यकता वाटते …?) स्त्रीकडून समाजाला खुप अपेक्षा आहेत  … ! पण सर्व अपेक्षाच्या केंद्र स्थानी फक्त पुरुषसत्ताक प्रवृतिला पोषक असे तिचे वळन  पाहिजे.!

     अशी वळणा वळणाच्या गुंत्यात अडकलेली स्त्री म्हणुनच एक आगळे  -वेगळे    सदैव दुभंगलेले  व्यक्तिमत्व  आहे असे वाटते  ….! 


                                                                                                                "समिधा" 
     
     

     

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......