" प्रिय पाऊसा ......!



प्रिय  …,
    खरं  तर ' सात जून ' हा दिवस पावसाच्या आगमनाचा  संकेत असतो   ....  मागच्या वर्षी मात्र पहिला पाऊस  कधी  पडला माहीत नाही   ....  पण यावर्षी  'पहिला पाऊस ' सात जूनलाच आला  ..... पहिल्या पावसाची पहिली  सर म्हणजे मातीच्या गंधाचा दरवळ  आणि आतापर्यंत तापलेल्या जमिनीला शीतलतेचा स्पर्श   ....  यावेळी सर्वांच्याच चित्तवृत्ति उमलुन येत असतात   … एक विलक्षण नवचैतन्याची लहर सा-या वातावरणात वहायला सुरुवात होते   .... त्यामुळे प्रत्येकाच्या मनात उत्साहाची हिरवळ फुलत असेलच  ....!! 

     हा अनुभव मला नविन नाही   ....  पण प्रत्येक वर्षी मनाला तो नविन भासतो   …!! म्हणूनच पहिल्या पावसाने दिलेला अनुभव एव्हढया आत्मीयतेने सांगावासा वाटतो   ....!! 

     ज्या दिवशी पहिला पाऊस आला त्या दिवशी माझी मनस्थिती थोड़ी बैचेन होती   … पण पाऊस आला आणि मनाची बैचेनी , मरगळ पार विरुन गेली   …!! मातीच्या  चित्तवृत्ति उल्हासित झाल्या   … आनंदी आवेगाने तो मृण्मयसुगंध साठवत  होते   … पण माला अजूनही न सुटलेले कोडं त्या दिवशीही पुन्हा कोडयात टाकून गेले     ....!!!

      पहिल्या पावसाचे आणि माझे काही  अनामिक बंध आहेत  ....?  की त्याच्या येण्याने माझ्या हृदयात अगदी एक अनामिक हुरहुर तो लावून जातो  ....  कशाची असते ती   …? जुन्या स्मृती अश्यावेली मातीच्या गंधासोबत आपलाही दरवळ मांगे सोडून जातात   …!!!

     माझ्याभोवतीचा हां अनुभव घेऊन मी पहिल्या पावसाला  एक फ्लाईंगकिस देऊन निरोप दिला   …! तोही  विरघळला  हळुवार थंडगार हवेत   …ओलेत्या पानांवरून घरंगळणा-या थेंबात   …!! मी  पाहिलं  तो शहारला  … माझ्यासारखाच   .... एका अनामिक स्पर्शाने   ....!!!


                                                                                       " समिधा "

    

1 टिप्पणी:

  1. खरच असं असत का हो....?

    खरच आपण लिहिलंत तसं पहिला पाऊस अनामिक हुरहूर लावून जातो का ?

    खरच पाऊस इतका सुखाऊन जातो का ?

    याचा अर्थ नाही कि आपण लिहिलंत ते खोट वगैरे आहे पण....

    मला तर पाऊस आला तर एकदम वैताग येतो कारण पावसामुळे सगळ planning बिघडत आणि कदाचित हे हि कारण असेल कि आमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये (सोलापूर) एक हि डोंगर नाही कि जो पावसानंतर आणखी सुंदर होऊन पाहावा असा होईल. किमान महाराष्ट्रामधे तरी, पावसामुळे जे सृष्टीसौंदर्य बहरत, ते कोकणात किंवा सह्याद्रीच्या आसपासच्या प्रदेशातच आणि ते मी कधी पाहिलंच नाही.

    काहीही असल तरी आपल्या सर्वांचा बळीराजा सुखावतो हे मात्र नक्की आणि हि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्यामुळे पावसाचा राग येत नाही.
    माझी प्रतिक्रिया फारच लांबतीये, थांबतो आता.

    उत्तर द्याहटवा

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......