स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष इतका महत्वाचा का वाटतो …?

     

                                                


       सुनंदा  पुष्कर यांच्या सारख्या शिकल्या सवरलेल्या , स्वावलंबी , शिक्षण , आर्थिक स्वावलंबन लाभलेल्या स्त्रीने जीने इथपर्यंतचा प्रवास अतिशय कनखरपणे केला   .... ती  स्त्री केवळ एका पुरुषासाठी आपले जीवन संपवू शकते  …?

         एकटे असून एकटे जगणे  शक्य होते  .... मात्र दुकटे असून एकटे जगणे खुपच कठीण  …! असा माणुस खचत जातो  ....! मग ही  शारारिक  बाब रहात नाही  …! ती मानसीक होते  … माणूस नैराश्याने वेढतो  आणि मग मनाने खचतो  तिथे मग स्त्री असो   वा पुरुष असो तो मग अश्या स्वत:ला  सपंविण्याच्या निर्णयाप्रत पोहचतो  …!!

          तरीही सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित होतो की   शिकल्या सवरलेल्या , स्वावलंबी , शिक्षण , आर्थिक स्वावलंबन लाभलेल्या स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष इतका  महत्वाचा  का  वाटतो  …?
         जेंव्हा याचा शोध घेते तेंव्हा मला समजलेली … उमजलेली काही कारणे आपली भारतीय समाज व्यवस्था याला जबाबदार आहे  ! कारण उच्च विद्या विभूषित  … स्वत:चे  एक विशिष्ट  स्थान प्राप्त केलेल्या स्त्रियांना कदाचित पुरुषी स्थैर्याची  गरज नसेल पण ज्या स्त्रियांचे विश्वच त्यांच्या पुरुषाच्या प्रेम, विश्वास  या भोवती वेढलेले आहे त्यांचे काय  …! ज्यांच्या जवळ शिक्षण, आर्थिक स्वावलंबन  सारे आहे  …! पण स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव नाही  … आणि कधी  असली तरी अश्या पुरुषी समाजात एकटे राहण्याचा आत्मविश्वास नसतो  …अश्या स्त्रीया  घरगुती हिंसाचाराच्या शिकार होऊनही कधी सामाजाच्या भीतीने त्याच्या बरोबर रहात असतात   …!  पण  तरीही काही स्त्रीया अगदी सामान्य स्त्रीयाही नवरा गेल्या  नंतर केवढ्या हिमतीने मुलांना वाढवतात  …आणि स्वत:ही जगतात   !   म्हणजे नवरा जिवंत असताना त्याच्या अस्तित्वाला डावलून जगण्याचा  संस्कार म्हणा , भीति म्हणा , या मुळे त्यांची तयारी   नसते  ! आणि म्हणूनच ज्याच्यावर त्या खरे प्रेम करतात म्हणून  … किंवा स्वत:चा स्वार्थ म्हणुनही   (  कोणताही स्वार्थ …) स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष  महत्वाचा  वाटतो  अगदी कुणाच्याही जीवापेक्षा   ....! 

   पण आजकाल ही परिस्थिति बदलत आहे   …! म्हणूनच कदाचित (मुलींकडूनही ) घटस्पोटांचे प्रमाण वाढत आहे  …!

                                                                                                          " समिधा "

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......