"जन्मलेल्या प्रत्येकाला " ................!!



एखाद्याचा जन्म दुस-या जन्माशी बांधलेला असतो तेंव्हा आईच्या उदरातुन जुळि भावंड जन्माला येतात …!
पुढ़ेही ती मानसिक रित्या अशिच जुळलेलि रहातात की नाही हा प्रश्न क़ाळाकडेच सोपविणे ईष्ट  …!

    काल घरी परतताना गाडीतिल चर्चेतुन समजले की ठाण्याला कामाला जाणा-या  एका २० -२१  वर्षाचा मुलगा गाडीतून वाकल्यामुळे बाहेरचा खांब लागुन पडला …. आणि त्याच वेळी लेडिज डब्यात बसलेल्या त्याच्या मैत्रीणीने गाडीतून उडी मारली …! (कदाचित ते एकमेकाना पहाण्याचा प्रयत्न करीत असावेत )आणि अश्याप्रकारे एक प्रेमकहानी संपली  …!! तिचा शेवट असा व्हावा  …?

     कालच मी प्रीया तेंडूकरांचे "जन्मलेल्या प्रत्येकाला " या पुस्तकातील "एकेका कथेचे एकेक शेवट " ही ललित लघुकथा वाचली  . प्रत्येक माणूस हा स्वतंत्र कथाबिज घेउन जन्माला येतो त्याचे आयुष्य एक त्याच्याही नकळत ओघात ओघवती घडत जाणारी कथा असते   …. ! तो त्याच्या कथेचि सुरुवात त्याच्या मर्जिप्रमाणे करतो … !(खरे तर या बाबत मतमतांतरे असू शकतात )पण त्या कथेचा शेवट अपेक्षेपेक्षा वेगळाच घडतो  ….!

   काल मी एकलेल्या घटनेतील प्रेमी  …. त्यांची ती "कथा "   'तो'  आणि 'ती ' दोघानी जन्म एकावेळि घेतला नाही  .  पण त्यांच्या प्रेमाची सुरुवात त्यांच्या मर्जिने झाली असेल , त्यांचे असणे एकमेकांसाठीच होते  . त्यानी कितीतरी एकत्र स्वप्ने पहिली असतील , त्यांचा जन्म विभक्त होता पण त्यांचे  जुळणे  मात्र "मृत्युच्या बिन्दुला येउन मिळाले होते  ….!

    त्या दोघांच्या  मिलनाची  " सम"  त्यांच्या एकाचवेळीच्या मृत्युपाशी  लागली  ….! ती "एकवेळ " त्यांच्या मिलनाची "मात्रा " होती …!!  त्यांचे जीवनगाणे /युगुलगाणे या पहिल्या मात्रेपाशीच संपावे  का  ….? त्यांच्या प्रेमकहाणीचा हाच शेवट  ….?  गाण्याच्या समेलाच दोघां गाना-यानी उडून जावे …? आणि हा त्यांच्या कथेचा शेवट  त्यानाही ठाउक नव्हता …!

     जन्मलेल्या प्रत्येकालाच आपल्या कथेचा शेवट  माहीत नसतो …! जन्मलेल्या प्रत्येकासाठी स्वत:चेच जीवन एक  "गूढ़ "कथा असते  …… ! आणि आपण जगत असतो म्हणजे काय करीत  असतो  …? आपल्याच जीवनाचे "गूढ़" उकलत असतो   …! पण या बाबत आपण अनभिद्न्य असतो  …. ! आणि या अद्न्यानातच सुख असते  ! आणि म्हाणुनच जीवन "सुन्दर आहे "  ….!!!!


                                                                                                                    "समिधा"


बलात्कार …बलात्कारी ......!!!!!

                                               
     काहीही करून आज आपण हा सिनेमा पूर्ण  पाहायचाच  …! गेल्या पंधरा वर्षात आपण  हा सिनेमा पूर्ण पाहूच  शकत नाही  …. का …?  पण आज  पाहायचाच असा मनाचा निश्चय  करुनच टिव्ही समोर  बसले 
घरात अर्थात माझ्याशिवाय कुणी नव्हते …. ! सर्व दारं खिडक्या नीट बंद केल्या आणि मनाचा हिय्या करून 
मी टिव्ही समोर  सिनेमा पहायला लागले  …… !

     आणि  जस जसा सिनेमा पूढे सरकत होता, आणि तो विशिष्ट सीन येण्याची वेळ जवळ  येत होती तस तसा माझा माझ्या मनावरिल आतापर्यंतचा ठेवलेला   ताबा सुटायला लागला  … माझ्या छातीत धडधड सुरु झाली  …कितीही कंट्रोल करीत असतांनाही डोक्याला झिनझिन्या येउ लागल्या होत्या  . आणि तो सीन सुरु झाल्या बरोबर आपोआपच माझे अवसान गळाले  …आणि मी रिमोट्चा ऑफ बटन दाबले  …. !!मी पुन्हा एकदा "तो" सिनेमा अर्धवट सोडला होता  …!!!

     "तो " सिनेमा म्हणजे   "बैंडिट क्वीन "  जो मी आजही पूर्ण पाहू शकत नाही  "फूलनदेवी " या एक सर्वसामान्य मुलीचा  "बैंडिट क्वीन"दरोडेखोर होण्या पर्यन्तचा जीवन प्रवास हा या चित्रपटाचा विषय आहे .आजही  या चित्रपटातील  "तो " बलात्काराचा सीन पहायची हिम्मत माझ्या जवळ नाही  …!  पण हल्ली तर रोज सकाळी उठल्या पासून एक नाही तर अनेक  "स्त्री" वरील लैंगीक अत्याचाराच्या बातम्या ऐकुन मनाच्या 
संवेदना भेदरून जात आहेत .आज एक स्त्री म्हणून विचार करताना स्त्रीच्या शरीराची चाललेली  वीटम्बना कशाचा परिपाक आहे ….?

     एका बाजुला एकविसाव्या शतकाच्याआगमनाचे ढोल वाजवीत नव्या संगणक आणि युगाच्या पहाटेची वाट पहात आहोत ….!  विलक्षण प्रगत  अश्या तंत्रयुगाच्या आगमनाची वाट पहात आहोत  .   स्त्रीया  आज शिकत आहेत  …. शिकवित आहेत  …!भारता सारख्या अतिपारंपारिक देशात स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नवनवीन क्षेत्रं पादांक्रात  करीत आहेत,  पण तरीही …पण तरीही प्रश्न उरतोच  …"आजची आधुनिक स्त्री खरंच "माणूस " म्हणून संपूर्ण समाजाकडून स्वीकारली गेली आहे  …?

     अजुनही स्त्रीचे "वस्तुपण" संपलेले नाही  . तिच्यावरील अन्याय अत्याचाराचा तपशील बदललाय   … !पण त्यामागचे पुरुषीमन तेच आहे .  कदाचित अधिक विकृत झालेलं  आहे …. !म्हणुनच  समाजातील पुरुषी विचारसरणी , मानसिकता महाभारत कालिनच आहे  . आजच्या दिल्ली , मुंबई मधील  बलात्काराच्या घटना कशाच्या द्योतक आहेत  … ! महाभारतात द्रौपदी , ययाति पुत्री माधवी यांच्यावरील पुरुषी वर्चस्वाच्या कहाण्या सर्वश्रुत आहेत  ….! आणि आजही कितीतरी द्रौपदी, माधवी  यांचे शील हरन  केले जात आहे . स्त्रीमनाचा आणि तिच्या भोवतीच्या वास्तवाचा कुणीतरी , कधीतरी वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे का  …. ….? जेंव्हा एखाद्या स्त्रीवर अत्याचार करून तिच्या शिलाचा , तिच्या कौमार्याचा भंग केला जातो तिची ती पीडा कोण लक्षात घेते  ….? स्त्रीवर असा घृणास्पद अत्याचार करणा-या पुरुषाची मानसिकता ,  ह्या क्रौर्य मनाचा पोत पुरुष मनच ओळखू शकतात  …! कारण स्त्रीची शील हरना नंतरची नव्हे ती  शील हरना  पूर्वीची मानसिकता मी  तो "बैंडिट क्वीन " सिनेमा पहात असताना अनुभवली आहे  …! तर प्रत्यक्ष असा घृणास्पद प्रसंग ज्या दुर्दैवी स्त्रीवर गुदरला  आहे  …. तिच्या मनाची पीड़ा कशी असेल  …???  स्त्रीच्या कौमर्याचे लचके तोड़नारे ही गिधाड़ेच आहेत ….!   स्त्रीच्या मनाची आणि देहाची विटंबना  करणारे हे नरभक्षक आहेत।  समाजात एकुणच समाज व्यवस्थेत स्त्रीचे चारित्र्यहनन करणे या इतकी सोपी गोष्ट नाही।       "स्त्री म्हणजे पैर की जुती "  किंवा   स्त्रीचे शील म्हणजे काचेचे भांडे  …. एकदा तडकले की परत सांधता येत नाही …"  हे या समाज व्यवस्थेतील स्त्रीयांबाबतीतिल अलिखित नियम आहेत  ….!  याच पुरुषी मानसिकतेतुन स्त्रीला नेहमीच दुबळ समजुन दाबलं आहे  … !  "भोगाची वस्तु " हेच तिचं मूल्य आणि समाजव्यवस्थेतील स्थान होउ पहात आहे  …!   आजकाल स्त्रीयांवरिल  अत्याचाराच्या घटनांमधे  ल क्ष णिय वाढ झाली आहे  .  परत एकदा स्त्री घराच्या उंबरठयाआड़ लपून राहिली  तरच ती  " सुरक्षित " अशी स्थिति या विकृत समाजाने स्त्रीवर आणली आहे  … !

  " स्त्री"आदिम काळा पासून स्वत:च्या केवळ "स्व" साठी  नाही तर स्वत:च्या मन्युष्यवत  अस्तित्वासाठी लढत  आहे।   तिने आजही हक्क ओरबाडून मिळवले नाहीत तर  स्त्रीत्वाच्या सर्व परिसीमा भेदुन पुरुषी सामर्थ्याच्या सर्व शक्यतां  पर्यन्त स्वत:ला सिध्द करून  मिळवले आहेत. ….! मग "संभोग " हाही तिचा स्वत:चा हक्क का असू नये…? तिथेच मात्र तिला घरी दारी हक्क नाकारला जातो . माणुसपणाच्या पुढाकारान  कधीच का घडू नये  संभोग … !  या विकृत समाजाकडून तोच तिचा हक्क ओरबाडून घेतला जात आहे ….!! तिचे लचके तोडले जात आहेत ….!  

     खरे तर  या देशातल्या सर्वसामान्य माणसाला स्त्री-पुरुषांना ख-या अर्थाने समानतेच्या जगात आणण्यासाठी आवश्यक ती मानसिकता , शैक्षणिक    आणि आर्थिक पात्रता प्राप्तच होउ नये  अश्या  दिशेने सगळा प्रवास चाललेला दिसतो . त्यामुळे कायदे ,  आयोग असोत की प्राचीन काळापासून चालत आलेली स्त्री गौरवाची सुभाषिते असोत, यांचा कितीही वर्षाव झाला तरी स्त्रीची परिस्थिति प्रत्यक्षात किती बदलली  …?बदलते?

     पण संघर्ष अटळ आहे.! आणि तरीही नदी,धरती ,आग, हवा ही सर्व स्त्री रूपं आहेत ,  शतकानुशतकांच मौन मोडून जेंव्हा ती  आक्रोश करतील तेंव्हा "भोगण" या शब्दाचा आविष्कार काय असतो त्याचा प्रत्यय सा-या जगाला येइल आणि त्याच दिवशी जगाला कळेल पुरुष प्रधान व्यवस्थेत काय अर्थ असतो "स्त्री" असण्याचा आणि का व्याकुळ होते  मन जेंव्हा तिचं माणूसपण  अमानुषपणे नाकारलं जातं आणि केवळ शरीर भोगलं  जातं  …! आणि त्याच दिवशी रुजतिल समाजात तिच्या विषयीच्या आस्था , दृढ़ता , प्रीती ,  आशा  , निष्ठा , प्रार्थना ,  वेदना  आणि  उदारता  …!!!! कारण …….

                                                                   "स्त्रीच   आई  आहे ,
                                                                     सावित्री  आहे ,
                                                                     राधा आहे,
                                                                    आणि दुर्गाही  आहे  ……!!!!!

                     

                                                                                                                         " समिधा"


                                         

          न भूतो न भविष्यति अशी रुपयाची घसरण झाली आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्यांपासून अगदी लक्ष्मीपुत्रांना अर्थात उद्योग धंदे व्यापा-यानाही सोसावा लागतो आहे  . 

          सर्वांना ओबामा यांची भारत भेट आठवत असेल त्यावेळी अमेरिके पुढे आर्थिक मंदी , बेरोजगारी हे प्राधान्याने मोठे प्रश्न होते  . त्यावेळी अतिशय मुत्सद्दीपने बराक ओबामा यांनी भारतातील उद्योगपतिंना , कारखानदाराना आर्थिक गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले आणि आपल्या सरकारला "भारत" हां भविष्यात जगातील आर्थिक महासत्ता होणारा  देश आहे " अशी गाजराची  वाजवून चांगलेच झुलवुन आपली झोळी भरून गेले आणि आज "कुठे भारत आणि कुठे गेली आर्थिक महासत्ता "

         भारताने आंतरराष्ट्रीय खुली बजारपेठेचे धोरण स्वीकारुन सर्वानाचा भारताची बाजारपेठ उपलब्ध करून 
दिली  .   आज भारतात भारतीय बनावाटिच्या वस्तुंनी बाजारपेठ काबिज केलि आहे. भारतातील प्रत्येक सन समारंभातिल वस्तु चीनी आणि त्याचा पहिला ग्राहक भारतातील फेरीवाले विक्रेते। … आणि अशी आर्थिक घूसखोरी कुणी   ? आणि कशी रोखायाची ? 
     आपला भारत देश हा "शेतिप्रधान देश आहे" अशी फक्त घोषणा  राहिली आहे आज आपण लसून, बटाटा , गहू पाकिस्तान आणि  आयत करतो  ….! 
     
. संगणक , मोबाइल ,  टी . व्ही  . यामुले जग जवळ आले आहे। …. पण त्याबरोबर आपल्यातील "भौतिक गोष्टींची" व्यसनाधीनता वाढते आहे   . आणि त्याचाह फायदा अमेरिके सारखी तंत्रदद्यानी राष्ट्र घेत आहेत  . 

           भारताची पर्यटन व्यवस्था पार कोलमडली आहे. आज उच्च मध्यमवर्गीय लोकही (श्रीमंत लोक तर परदेशातच खरेदी करतात) परदेशात फिरायला जायला लागले आहेत  . भारतीयाना सोन्यामधील गुंतवनुक अधिक सुरक्षित वाटते।  आणि भारतीय एकुणच संस्कृतीचा  तर ते सोने हे भारतीयांचे केवल गुंतउकिचे साधन नाही तर ते  एक अविभाज्य अंग आहे. पश्चिमी देशांत असे महत्व सोन्याला नाही। पण त्यामूले सोन्याची आयात वाढली आहे  . पण त्यासाठी सरकारने गोठवलेले सोने बाहर काढने गरजेचे आहे।   
"भ्रष्टाचार"  हा तर  कलिचा प्रश्न आहे. कोट्टयवधीचा काळा पैसा भारताबाहेर आहे. तो भारतात येणे आवश्यक आहे. "ग्लोबलायझेशन " वाढले पण त्याबरोबरच रुपयाचे "डिमोशन" मात्र झाले। 

          रुपयाची किंमत सुधारायची असेल तर परत एकदा "गंधिजिनी" दिलेला "स्वदेशिचा नारा " भारती यांमधे  जागवन्याची   गरज आहेच … ! जस्तिजास्त गुंतवनूक भारतीय उत्पादनात करून भारताला आधुनिक तंत्रदद्यानाची जोड़ देने आवश्यक आहे। . 

     आपल्यातील राष्ट्रीय अस्मिता जागवा   …! स्वदेशी वापरा रुपया वाचवा  …. ! 

         

     

""".......पाऊस ....... """"






     
          पाऊस गारांचा ,पाऊस सरींचा ,रस्ते गटार तूंबविणारा , दोन  चार इमारती पाडणारा ,गाड्या घोड्या अडविणारा .... माणसांना सळो की पळो करूंन  सोडणारा .... असा हा वात्रट ... धांद्रट  पाऊस ......!

          पाऊस ..कसा तर अगदी पावसा सारखा चिखलात लोळणारा ... नदित डुम्बणारा  , सागराच्या लाटांवर स्वार होणारा ....वादळा बरोबर भरकटनारा , पानांतुन निथळणारा ....कौलांवरुन ओघळणारा .... फुला पानांवर रमणारा ...... अगदी गटार .. नाल्यात तुंबणारा ... असा अनेक विविधांगी .... बरसना-या पावसाचा पहिला स्पर्श मातीला होतो .... आणि सा-यांना पाउस मातीचा सुंगंध म्हणजे त्याच्या चैतन्यमय अस्तित्वाची चाहुल देतं ...! तो सुगंध किती घ्यावा आणि किती नाही .... सारे भानच सूटते ....!

           पाउस अनुभवता येतो .... अगदी आपला आपणच .....! पावसाबरोबर कोसळताहि येतं ....! बरसायचे असेल त्याच्या सोबत तर मनातले कढ डोळ्यात दाटले की ... कोंडलेल्या आसवांना पावसाबरोबर बरसु द्यायचे ... म्हणजे मनही आकाशा सारखे हलकं फुलकं निरभ्र  होतं ....! गुंतलेल्या ... अडकलेल्या मनाला मोकळे सोडावे , पावसाच्या धारांत जाऊ द्यावे ... अगदी कागदी होडी प्रमाणे ... मनाबरोबर आपणही बाहेर जावे ...!        पाऊसाचे थेंब अंगावर शहारे आणतात ..... ओलेचींब झाल्यावर अंगाअंगात भिनतात ......!

         पाऊस जोड़ीनही अनुभवता येतो ......! पावसाच्या प्रत्येक सरीनं देहातील कण न कण पेटून उठतो ...! अंग लपेटून ...संकोचुन आडोश्याला उभे रहातो .....! पण त्या अदवैताला फक्त पाउसच साक्षी असतो…. !!!!
पाउसासारखं जगता आले पाहिजे .. बेधुंद ..... नवजीवनाला प्रतिक्षण जिवंत ठेवत ......!

          पावसाचे शांत ...शीतल  निश्चल ...अस्तिव ... कधी कधी आपल्याला मुळासकट  हादरविते…. ! पावसाचे रौद्र रूप माणसाच्या अस्तिवाला मिटवू शकतो …!


"पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले"

                                                                             किंवा

           "नको नको रे पावसा ... असा धिंगाणा तू घालू ....! 
        झोपड़ी चंद्रमौळी  माझी बघ जाईल वाहून 
       धनी गेला दूर देशी .... त्याला येउ दे परतून "


      असा हवा हवासा वाटणारा पाउस असा बदलला  की नको नकोसा होतो .......! 


                                       "अति पावसाचे लाड नाही कुणी करित…! 
                                       वहाता वहाता त्याने भानही  ठेवायाचे .... 
                                        दूर कुठेतरी कुणाचे घर आहे मातीचे ...."




                                                                                                                  समिधा

   

          




        




       






लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......