" प्रिय पाऊसा ......!



प्रिय  …,
    खरं  तर ' सात जून ' हा दिवस पावसाच्या आगमनाचा  संकेत असतो   ....  मागच्या वर्षी मात्र पहिला पाऊस  कधी  पडला माहीत नाही   ....  पण यावर्षी  'पहिला पाऊस ' सात जूनलाच आला  ..... पहिल्या पावसाची पहिली  सर म्हणजे मातीच्या गंधाचा दरवळ  आणि आतापर्यंत तापलेल्या जमिनीला शीतलतेचा स्पर्श   ....  यावेळी सर्वांच्याच चित्तवृत्ति उमलुन येत असतात   … एक विलक्षण नवचैतन्याची लहर सा-या वातावरणात वहायला सुरुवात होते   .... त्यामुळे प्रत्येकाच्या मनात उत्साहाची हिरवळ फुलत असेलच  ....!! 

     हा अनुभव मला नविन नाही   ....  पण प्रत्येक वर्षी मनाला तो नविन भासतो   …!! म्हणूनच पहिल्या पावसाने दिलेला अनुभव एव्हढया आत्मीयतेने सांगावासा वाटतो   ....!! 

     ज्या दिवशी पहिला पाऊस आला त्या दिवशी माझी मनस्थिती थोड़ी बैचेन होती   … पण पाऊस आला आणि मनाची बैचेनी , मरगळ पार विरुन गेली   …!! मातीच्या  चित्तवृत्ति उल्हासित झाल्या   … आनंदी आवेगाने तो मृण्मयसुगंध साठवत  होते   … पण माला अजूनही न सुटलेले कोडं त्या दिवशीही पुन्हा कोडयात टाकून गेले     ....!!!

      पहिल्या पावसाचे आणि माझे काही  अनामिक बंध आहेत  ....?  की त्याच्या येण्याने माझ्या हृदयात अगदी एक अनामिक हुरहुर तो लावून जातो  ....  कशाची असते ती   …? जुन्या स्मृती अश्यावेली मातीच्या गंधासोबत आपलाही दरवळ मांगे सोडून जातात   …!!!

     माझ्याभोवतीचा हां अनुभव घेऊन मी पहिल्या पावसाला  एक फ्लाईंगकिस देऊन निरोप दिला   …! तोही  विरघळला  हळुवार थंडगार हवेत   …ओलेत्या पानांवरून घरंगळणा-या थेंबात   …!! मी  पाहिलं  तो शहारला  … माझ्यासारखाच   .... एका अनामिक स्पर्शाने   ....!!!


                                                                                       " समिधा "

    

'कन्फेशन बॉक्स' ….!

 सॉरी  शोना  .... परत असे नाही होणार   … !  आणि असं मी म्हणताच माझी लेक माझ्यावर काही वेळापूर्वी रागवलेली असते ती मला एका क्षणात प्रेमाने बिलगते   ....! 
       खरच आहे आपण कित्येकदा आपल्या पिलांवर केवळ  आपल्याला आवडले नाही म्हणून त्यांनी त्यांच्या आनंदासाठी केलेल्या कित्येक गोष्टीसाठी  आपण रागावलेलो असतो  …… ! फटकावलेले असते …!  पण  ती  मात्र आपल्याला किती सहजपणे माफ करतात …! ( खरच माफ करतात की आपला तो "सॉरी"   म्हणतानाचा  बापूडवाना चेहरा पाहून त्यांना त्यावेळी दया येते…?)  पण   जसजसे ते बुद्धीने आणि वयाने मोठी होतात त्यांच्यातील मानापमानच्या  जाणिवा जाग्या होतात ……!  त्यांच्यातील बालसुलभता हळुहळू कमी होऊन  मोठ्यांमधला व्यवहार त्यांच्या ठायी येतो तेंव्हा मात्र आपण अस्वस्थ होतो  …!  ह्या  स्वभावातील आवर्तनातून आपण मोठेही गेलेलो असतो   … … तरीही त्यांच्या वागण्याने आपल्याला धक्का बसतो. 

        खरे तर आपल्या मुलांना समजून घेणे आणि समजावून सांगणे एका पातळीवर फारच कठिण असते  .   त्यावेळी आपल्या संयमाची खरी कसोटी लागते   .... !  मुलांमुळे संयम आणि सहनशीलता आणि अतीव  माया हे  स्वभावतील स्थित्यंरण  आपले पूर्ण व्यक्तिमत्त्व बदलू शकते   !   आई /बाबा  होण्यापूर्वीचा आपला हटटीपणा , संताप तुलनेने कमी झालेला असतो  … हृदयातील माया , कणव  जास्तच वाढलेली असते  … !  एक नवा आयाम संपूर्ण  जगण्याला आणि वागण्याला मिळत जातो  .... ! 

        मी माझ्या लेकीची  अत्यंत आभारी आहे  … !  तिच्यामुळे आज माफ़  करण्यातला सहजपणा मला कळला  … !  माफ करण्यातला आनंद कळला  ....! संयम, सहनशीलता, प्रेम याची नेमकी ओळख करून दिली   .... !!   
थैंक्यू शोना  .....!! 

पुष्पांजली कर्वे


                                                                                                                                              समिधा                                    

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......