"देवाशी भांडण"

"देवाशी भांडण" या लेखावरिल वरील आपले विचार  काही पातळी वर समर्थनीय वाटतात  तर काही पातळीवर मनाला पटत  नाहीत .
     एक म्हणजे "देवाशी भांडण" करणारी स्त्री ही पुरुष प्रधान समाजरचनेला शरण गेलेली पापभिरू स्त्री वाटते .किंवा कदाचित ती  खरोखरच दुस-याच्या उद्धारात आपला उद्धार आहे असे समजुन उमजुन 'सवत ' घरात आणून स्वत:च्या स्वत्वाला मिटवून 'मोठ्या हृदयाची  म्हणून त्यागमूर्ति झालेली 'निष्ठावान स्त्री असावी असे वाटते .
    पण दूसरी आजची आधुनिक बुद्धिवादी स्त्री मला अधिक खरी वाटते  .  कारण ती  तिच्यातील स्वत्वाशी      ख-या अर्थाने निष्ठावान आहे , त्यामुले ती  पुरुषी समाज रचनेला शरण जात नाही की त्याग मूर्ति हो सार्थक्यही मिळवत नाही .ती आपली निष्ठा डोळसपणे जागवते/जगवते  म्हणून कोणतीही सजग आधुनिक स्त्री जेंव्हा तिला  कळते की , आपला नवरा आपल्याला मूल देऊ शकत नाही तेंव्हा ती आधुनिक बुद्धिवादी 
स्त्री डोळसपणे परिस्थितीचा स्वीकार करते 'त्याचा ती त्याग करत नाही तर उपलब्ध सर्व उपचार उपायांचा अगदी 'दत्तक ' घेण्याचाही निर्णय घेण्यास तयार असते . पण जर याच्या  उलट परिस्थिति असेल तर ...?पुरुष काय करेल , जरी त्याची मूल्य, निष्ठां कितीही घट्ट असले तरी परिस्थितीला मुरड  घालणार नाही .... तो  मुल्याना त्याच्या निष्ठेला मुरड  घालेल ....! (म्हणजेच स्वत:ची समाज मान्य सोय पाहील )
    त्यामुले आजच्या आधुनिक बुद्धिवादी स्त्रीचे वागणे व तिची  बदलाणारी मूल्य ही तिच्या ठायी बदलत      असणा-या  सक्षमतेचे प्रतिक आहे असे वाटते .....!
     एकुणच जगण्याच्या मुल्यांचा विचार केला तर जसे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे . मग मानवी मूल्य काळाप्रमाणे बदलणारच .....त्यांच्यातही परिवर्तन घडणारच (कारण आज परिस्थितीला मुरड  घालण्यापेक्षा मुल्यांना मुरड घालणे अधिक सोपे झाले आहे )
     मुल्यां बाबत अधिक व्यापक विचार केला तर "जेंव्हा मूल्य ही मानवी जीवनाची वृत्ति बनते  तेंव्हा मानव स्वत:पासून मुक्त होउन सर्वांशात जाउन मिळतो    ....! अर्थात मुल्य आपला आत्मशोध आहे जो परमात्म्याशी जाउन मिळण्याची शक्ति आहे ऊर्जा आहे .  आणि अशी ऊर्जा स्वत:पार होउन इतरांच्या ठायी आनंद देण्यास आपल्याला उद्युक्त करते  ...! आणि म्हणुनच 'आनंद ' चित्रपटातील 'आनंद' मला खरा वाटतो ....!
        थोडक्यात   आजची परिवर्तनशील मूल्य आजच्या जगण्यासाठीची गरज असेल व "जगण्याशी प्रमाणिक असतील" तर ती  लेखन आणि प्रत्यक्ष जगण या दोन्ही स्तरांवर स्विकारावीच लागतात ….!


                                                                                                    "  समिधा "



२ टिप्पण्या:

  1. "पण जर याच्या उलट परिस्थिति असेल तर ...?पुरुष काय करेल , जरी त्याची मूल्य, निष्ठां कितीही घट्ट असले तरी परिस्थितीला मुरड घालणार नाही .... तो मुल्याना त्याच्या निष्ठेला मुरड घालेल ....! (म्हणजेच स्वत:ची समाज मान्य सोय पाहील )"... This is not totally correct.. sagalech Purush sarakhe nasataat.. jashi aadhunik stri aahe tasach aadhunik purush hi aahe sadhuachya yugaat... Aani Stri-purush doghan madhe hi changali-waait pravrutti aahe. doghankade ahankaar , lobh , vaasana.. dileli aahe ani tyancha te lok kasa ani kaay upyog karataat.. tyawar te changle kiva waait manave... Mee stri la jevadhe manato tevdech purushala hi manato..saruch purushana athava striyana ekaach drustikonatun pahu naka.. stri - purush ek-mekansachi garaj ahet aani nisargane tyasathich tyana banavale aahe... jari nisargala parivartan maanya asel tar te donhi bajula manya asel .. nisargane banavataanach sarv staravar parivartanachi kaalaji ghetali aahe..
    Baki he khare ki jaganyashi(swatachya) pramanik asave.. swatachya jaganyaha aarth neet samajun ghyaawa...

    उत्तर द्याहटवा
  2. Sagar,

    tuze vichar changale aahet....! asehi vichar pudhe aale pahijet...! mhanaje stree -purush sambandhalil mulyanche parivartan ekangi nasave.....!

    उत्तर द्याहटवा

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......