आजचा समाज कुठे चालला आहे …. ?

    

                            


     आजचा समाज कुठे चालला आहे  …. ? जुन्या पारंपारिक नितिमुल्याना चिकटून बसलेला समाज आजच्या यंत्रयुगात माणसाच्या मनात संघर्षच निर्माण करीत आहे  .  माणसाचा माणसावरचा विश्वास उडत चालला आहे  . भोगवादाच्या आणि वासनेच्या नशेचं प्रमाण वाढत आहे   . जुनी नैतिक मूल्य जोपासली जात नाहीत  .  पैशाला अवास्तव महत्व आल्यानं कुठल्याही नितिमुल्यांची चाड  न बाळगता तो मिळवण्याच्या मागे माणूस धावत आहे  . भावभावनांनाही बाजारी स्वरुप   येत आहे की काय असं वाटत आहे  .  

     यंत्राला मन  नसतं , अगदी संगनकावरही हुकूमत चालते ती माणसाची  .  जो पर्यन्त माणसाच्या मनाची जागा यंत्र घेऊ शकत नाही तोपर्यन्त माणसाची मन:शक्ति सर्वश्रेष्ठच राहणार  .   म्हणुनच मला वाटते की माणसाच्या प्रेमभावना , वात्सल्यभावना आणि स्नेह्भावना जपनं आवश्यक आहे  .  या भावनांचे  बंध  गुंफणारी  नवी मूल्य आणि त्यावर आधारलेला समाज व कुटुंबव्यवस्था निर्माण करणे अधिक निकोपपणाचे ठरेल  असे वाटते  …! 


                                                                                                                   " समिधा "
     
     
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......