"आपल्यातला चंद्र....!"


प्रतिमेत याचा समावेश असू शकतो: एक किंवा अधिक लोक, संधिप्रकाश आणि महासागर


      आपलं मन ...अनेक त-हेच्या विचारांनी भरुन असतं...! सद्यपरिस्थीतीचा विचार केला की वाटते आज प्रत्येकजण आपल्या मनमस्तिश्काचा दरवाजा बंद करून बाहेरील विचार भिंतींवर वाटा शोधण्यासाठी डोके आपटीत आहेत.
आपल्या प्रत्येकाला सुख समाधान शांतीचा चंद्र हवा असतो आणि आपण सर्व तर पाण्यात पडलेल्या चंद्रबींबाकडे धावत आहोत आणि तो चंद्रबींब ज्या पाण्यात आहे त्या पाण्याच्या मोहात अडकून त्यामध्ये अविचाराने बुडत आहोत ....पण ते पाणी जेव्हा संपूर्ण वाहून जाईल तेव्हा तो चंद्रबींब तिथे असेल ...?अर्थातच नसेल...!आणि तेव्हा आपले लक्ष वर आकाशाकडे जाईल तिथे ख-या चंद्राचे दर्शन होईल .
 
      अगदी तसंच बाहेरील विचार आचारांमधील संक्रमणात स्वत:ला भिरकावून देण्यापुर्वी आपल्या आतल्या अंतरमनातील अनुभूतीला एकदा पहा!
 
      आपण जे , ज्यांना वाचतो ,पहातो , ऐकतो हे सारं काय आहे...?ही सारी बोटं आहेत....!ज्यांना धरून आपण त्यांनी दाखविलेल्या मार्गांनी चालत असतो आणि ती बोटं धरून चालतच रहातो..! आपण ती बोटं तर सोडत नाहीच उलट आपण त्या बोटांनाच पुजायला लागतो....त्यांचेच उत्सव करायला लागतो!
 
खरं तर त्या बोटांना मागे सोडून , त्या बोटांत बोटं न अडकवता आपल्या आंतरीक अनुभूतीच्या शक्तीला सोबत घेऊन जीवनानूभवाला पहायचे , ती आपल्याला खरा प्रकाश दाखवते , खरे ,ज्ञान देते...!
ज्या दिवशी मोहमयी पाण्यातला चंद्रबींब मिटून जाईल , अशाश्वत बोटांची साथ सुटून जाईल तेव्हाच अंतरातला अनुभव चंद्र आणि आंतरीक शक्तीची शाश्वत साथ सोबत असेल ! ही सोबत प्रत्येकाला लाभो हीच प्रार्थना!
 
© पुष्पांजली कर्वे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......