२६ जानेवारी … प्रजासत्ताक दिनाची एक सदिच्छा ... खरे अभिवादन......!

                                     

         २६ जानेवारी  … प्रजासत्ताक दिन जवळ येत आहे  …! शाळेत असतांना ह्या दिवसांचे मला कोण अभिमान आणि ओढ़ असायची   … कड़क इस्त्रीचे कपडे घालून ताठ मानेने झेंडा वंदन करण्यातील आनंद घेणे मला खुपच आवडायचे   ....  तो दिवस मी स्वातंत्र्य लढ्यातील सर्व हुतात्म्यांना अभिवादन करुन साजरा करीत असे  …!  आणि संध्याकाळी  मुस्लिम वस्तीत तिथल्या शाळांमध्येही  ध्वजारोहण केले आहे की नाही हे पाहण्यासाठी जात असे  … (बालबुद्धि  …… देशप्रेम,   देशाभिमान व्यक्त करणे  … इतरांचे पारखने  सारेच गमतीशीर होते  …! ) 

   पण पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन  , १५ ऑगस्ट  स्वातंत्र्य दिन हे  सुट्टीचे दिवस म्हणूनच अधिक साजरे होउ लागले  …! कॉलजे मध्ये हे दिवस फक्त N. C. C. कैम्प मध्ये साजरे करतात  … !याच दिवसात कुठल्यातरी राजकीय युवा सेनेचे हौशी कार्यकर्ते असतांना शाळांमध्ये जाऊन झेंडा वंदन करीत असे  …! पण पुढे ती संघटना बंद पडली आणि आमचे झेंडा वंदनही  !पण मी सुद्धा ह्या दिवसांचे महत्व कमी केले  होते हे मात्र माझ्यासाठी अक्षम्य आहे   ! 

        आजही भारतीय ह्या दिवशी पिकनिक अरेंज करतात  .... ! आजची सारी धर्मं आधारीत अघोरी प्रेमाची अतिश्योक्ति पाहिल्यावर  … त्याचे राष्ट्र उभारणीवरील , प्रगतिवरील परिणाम पाहता प्रत्येक भारतीयामध्ये अन्य कोणत्याही प्रेमापेक्षा राष्ट्रप्रेम अधिक प्रखर असणे गरजेचे आहे  असे वाटते   !  

       शाळांमध्ये जसे विद्यार्थी  प्राथर्ना  ,  राष्ट्रगीत  गातात   .... तसेच ते महाविद्यालयातही  आपल्या देशाचे राष्ट्रगीत गायलाच पाहिजे   .... ! पण  तसे ते राष्ट्रगीत गान सक्तीचे केले नसल्याने  शाळेतून महाविद्यालयात आल्यावर मात्र हे राष्टप्रेम कमी होत नसले तरी त्याची तीव्रता नक्कीच कमी होते  … ! भारताच्या  प्रत्येक भावी पिढीतील   राष्ट्रप्रेम  हे इतर कोणत्याही प्रेमा पेक्षा अधिक  प्रखर व्हायला पाहिजे   …!!! तरच २६ जानेवारी  .... १५ ऑगस्ट हे दिवस फक्त राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचे दिवस रहाणार नाहीत  …!तर सीमेवर लढणा-या सैनिकाप्रमाणे सतत हे राष्ट्रप्रेम  जागृत असावे  … सतर्क असावे  …! राष्ट्रपेक्षा काहीच महत्वाचे नाही  …!  प्रत्येकाचे  आपले धर्मं आचरण केवळ आणि केवळ राष्ट्रहीतासाठीच असावे  …! राष्ट्रपेक्षा कुणीही मोठा नसावा   ....!  राष्ट्र   ....  देश   … आहे  म्हणून आपण आहोत  ....!!! 

         आज भ्रष्टाचार मोठा झाला आहे   !  आज कटटर धर्मांधता  मोठी झाली आहे  …! दहशतवाद मोठा झाला आहे  .... आज पैसा मोठा झाला आहे  ....!! आणि आज माणुस , माणुसकी , पर्यावरण , सा-या सा-याचा हळुहळु -हास होत आहे  …!!!  राष्ट्रप्रेम प्रखर करा   … राष्ट्र वाचवा   आणि  हेच यावर उत्तर आहे  सीर सलामत तो पगड़ी पचास  राष्ट्र वाचला तर आपण वाचू  ....! आपले अस्तित्व राष्ट्रामुळे आहे  …! धर्म , संस्कार ,संस्कृति , परंपरा  ह्या राष्ट्रिय स्तभांचे स्तोम माजविण्या पेक्षा पर्यावरण-हास , भ्रष्टाचार,अत्याचार, दहशतवाद, बेकारी,गरीबी ,  परकियांची  घूसखोरी  या संघर्षासाठी साठी  मैदानात येण्याची गरज आहे  …! प्रत्येक राष्ट्रभक्ताने  आपापल्या परीने थोडासा खारीचा वाटा उचलावा  ....!!! हीच  सदिच्छा  ....! आणि हीच आपल्या  स्वातंत्र्य लढ्यातील सर्व हुतात्म्यांना खरे अभिवादन ठरेल  ....!!! 

                                                                   
                                                                                                                 
                                                                                                            समिधा 







आशेला नवे पंख फुटु दया ........!

     मनाला नवे पंख फुटले की माणूस स्वप्नांच्या अवकाशात स्वत:ला झोकून देतो आणि कल्पनातरंगाची अनेक वलये तो आपल्या भोवती वेढून घ्यायला लागला कि नकळत तो स्वत:पेक्षा या दिवास्वप्नामध्येच अधिक गुंतायला लागतो   .... !!स्वप्नं भंगली की  मन निराश होते   …। आणि ते मग सर्वांमध्ये असूनही अलिप्त राहायला लागते   … शरीर बोलत असते पण मन   .... मात्र कुठल्यातरी नकळत्या कोप-यात एकटेच विचार तंद्रित भरकटत दूर   .... जात असते   …! पुन्हा पुन्हा ते समोरच्या वास्तवात येण्याचा प्रयत्न करीत असला तरी निराशा तसे करू देत  नाही  .... !  अश्या निराश मनाला स्वत:भोवती गोळा  करण्यास  बरेच प्रयास पडतात  .... आणि असे मन थकून भागुन  परतले कि , समोरच्या वास्तवाशी त्याचे नाते तुटलेले असते वास्तवाचे मन तो पर्यन्त दूर गेलेले असते  …!

     कधी कधी  हे निराश मन  … दुस-या मनाचा आधार घेते  … त्यावेळी दुस-या मनाने  सांत्वन करणे  त्याला त्यावेळी हवेहवेसे वाटत असेल तरी सुद्धा त्याला ते मन  कितपत समाधान देईल हे परिस्थिति प्रकृतिवर अवलंबून असते   …। कदाचित हे दूसरे मनही  निराश मनासारखे समदुःखी असेल तर साथ सोबतीने  वाटचाल करण्यास त्याना आनंदच होत  असतो  … ! पण दोघांचा प्रवास नव्या आशावादाकडे होत नसतो  …!!

                                 


    म्हणूनच  मनासारखे आशेलाही नवे  पंख फुटू शकतात  ....! एकीकडून निराशा झाली पण दुसरा मार्ग खचितच मोकळा असतो  …!  फक्त तो आपण सतर्क व्यापक दृष्टीने शोधायचा असतो  …! कारण अनेक मार्ग आपल्या समोर असतात हे काहीअंशी  खरे असेल तरी आशेला नवे  पंख फुटल्यावर सर्वच मार्ग सुकर वाटतात   … आपलेच वाटतात   …! म्हणूनच आशेला नवे   पंख फुटु दया  .... ! त्या पंखानी आपण आकाशावरच स्वार  होण्यास सज्ज होणे  म्हणजे खरा आशावाद आहे  ....!

                                                                                               "समिधा "





लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......