"मंगळसूत्र "

 "केव्हातरी या स्वप्नातुनी
पड़ेन  का मी बाहेरी
एकदाच , जाईन जेंव्हा मी
अखेरच्या त्या माहेरी
तेंव्हा ही पण असेल माझ्या
सूत्र प्रीतीचे हेच गळां ,
भाळावरती असेल तेंव्हा
अहवतेचा हाच टीळा| "

     कवितेच्या या ओळींमध्ये एका विवाहित स्त्रीची कपाळावरचं कुंकु आणि गळ्यातलं "मंगळसूत्र " या  अहवतेच्या या लेण्यांसह अंतीमच्या माहेरी जाण्याची इच्छा दिसते  ....!! आपल्या भारतीय संस्कृतीत   "कुंकु" आणि  " मंगळसूत्राला " एखाद्या स्त्रीच्या ठायी हे एवढे  महत्व आहे !

      स्त्रीच्या लग्नानंतरच्या तिच्या आभूषणांत "मंगळसूत्र " हे एक आभूषण वाढलेले असते  …एक "दागिना" एवढीच किंमत असते का "त्याला " त्या दागिन्यात कुणाच्यातरी हक्काची बायको हेच  फक्त अधोरेखित होते का  ....? खरच  गळ्यातील हे  काळे मणी  स्त्रीच्या अस्तिवाला संरक्षण देतात का असा विचार केला तर   हल्लीच्या समाजात वावरताना मला आज अश्या अनेक स्त्रीया दिसतात ज्या विवाहीत सधवा असूनही मंगळसूत्र घालीत नाहीत  …! का  …?  कदाचित ते त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या आड़ येत असावे   .... किंवा "मुक्त स्त्रीमुक्तीच्या भूमिकेतून "मंगळसूत्राला " एक "दागिना "  या पलीकडे महत्व त्यांना द्यावेसे वाटत नसावे  .... !  किंवा अगदी  साधेसे  कारण मॉडर्न आउटफीट वर ते आउटडेटेड फॅशन केल्या सारखे वाटत असावे  ....! 

     आता एवढे विवेचन केल्यावर वाचणा-यांच्या भुवया कदाचित उंचावल्या जातील  म्हणजे मी "मंगळसूत्र " न घालना-या स्त्रियांना हिंदू संस्कृतिच्या मारक तर ठरवित नाही   …?

    पण खरं तर मला वेगळाच प्रश्न पडला आहे   …!  कारण मी आज अश्याही स्त्रीया पहाते आहे ज्या विधवा आहेत  …अगदी प्रौढ़ कुमारीका आहेत पण त्याही गळ्यात मंगळसूत्र  घालताना दिसतात .... !   का  …?  नव-या शिवाय , एका पुरुषा शिवाय परंपरावादी पुरुषी समाजात वावरताना  स्वरक्षण व्हावे या साठी   …? बरे  हे स्वरक्षण कुणापासून  आणि कसे  हा मोठा प्रश्नच आहे ! कारण हल्लीच्या काळात  मुक्तस्वातंत्र्याचे स्वैर वारे संपूर्ण समाजातच वाहत आहेत  ..... त्यामुळे हे "मंगळसूत्र " पुरुष काय आणि स्त्री काय दोघांचेही नित्तिमता आणि नैतिकता टिकवण्या साठी किती उपयोगी आहे हा अभ्यासाचा विषय व्हावा !
      खरे तर नवरा नसला म्हणून काय झाले   … त्याच्या मागे मी माझे सौभाग्यलेणे का त्यागुं  …? या भूमिकेतून   ज्या स्त्रीया मंगळसूत्र घालतात त्यांचे कौतुक करावे की "मुक्त स्त्रीमुक्तीच्या आणि पुरुषप्रधान संस्कृतीला छेद म्हणून  "मंगळसूत्राला " एक "दागिना "  या पलीकडे महत्व नाही या भूमिकेतून मंगळसूत्र घालणे नाकारतात त्यांचे कौतुक करावे? 
                                     

       थोडक्यात आजच्या  आधुनिक स्त्रीचे विचार आणि कृती  दोन्हींचा गोंधळ उडालेला दिसतोय ..! म्हणजे  " मंगळसूत्र" हे स्वरक्षण आहे , परंपरा संस्कृती  आहे , की  केवळ एक आभूषण आहे...? आजच्या समाजातील स्त्री पुरुष  विशेषतः स्त्रीया या "मंगळसूत्राला" नेमक्या कोणत्या भूमिकेतून पाहतात हे समजून घ्यायला आवडेल  ...!
 

                                                                                                     "समिधा" 
              

 


              

"संकलन " हे श्री . बा . जोशींचे पुस्तक

     "संकलन " हे श्री  . बा   . जोशींचे  पुस्तक वाचले   …!  यातील प्रत्येक निबंध वाचताना हे पुस्तकच आपल्या संग्रही असावे असे वाटले  . लेखक कलकत्त्यातील  राष्ट्रीय ग्रंथ संग्रहालयात ग्रंथपाल असल्यामुळे त्यांचे  अफाट वाचनाची कल्पना येते  …! या "संकलनात "  एकूण सतरा निबंध आहेत  . 

     "लिहून छापून नामानीराळे" या लेखाने  मी थक्कच झाले   .  नामांतर वाद आपल्याला नवा नाही  पण  तो किती  जूना आहे हे वाचून गंमतच वाटली   .! नाव बदलने हा प्रकार किती  रोचक आणि मनोरंजक असू शकतो याची प्रचिती हा  लेख वाचून आला   .  नाव बदलूं लिहिणारे देशी परदेशी लेखक त्यामुळे उडणारे गोंधळ सारे वाचताना मजा येते  .  

     "खोदावया हवे खोल" हा लेख म्हणजे माहितीचा खजिना  !  यात पुराविद्येचा परिचय मिळाला  .! या पुराविद्येतही  प्रागौतिहासिक  आणि साधारण पराविद्या असा स्थूल भेद करण्यात येतो   . तसेच संग्राहक आणि संशिधक यातही फरक  आहे  .  संशोधनाच्या चार पातळया -
१. भूपृष्ठ संशोधन  २. भूमिगत संशोधन  ३. जलगत संशोधन  आणि ४. आकाशगामी संशोधन  या सर्वाँबद्दल वाचने म्हणजे नव्या अद्भुत गोष्टीचा अनुभव घेणे  ! 

     "माणुस  रविंद्रनाथ "  या लेखात रवीन्द्रनाथ टागोरांचा संपूर्ण परिचय घडतो  .   त्यांच्या स्वभाव वैशिष्टयांपासून ते त्यांच्या आहार शास्त्रापर्यंत , त्यांच्या दैनंदिन व्यवहारापासून ते त्यांच्या लेखनापर्यंत     सा-याचा अत्यंत रोचक भाषेत वेध घेतला आहे  .! रवीन्द्रनाथ टागोरांना नविन नविन पदार्थ खाण्याची  आणि करण्याचीही आवड होती   .!  आणि त्यांचा पेहराव निसर्गातील प्रत्येक मोसमाचे स्वागत करणारे असे  । या लेखातुन  त्यांचे  आलौकिकत्व पटते  .  

     यातील "अहिल्या कर्मयोगी " हा लेखहीं असाच सुन्दर आणि रोचक आहे   !  पेशवकालिन एक स्त्री  .  ज्या स्त्रीला दैवाने अनेक समरप्रसंगातून जाण्याचे भाग्य् दिले   … त्या दैवालाच तिने जीवनांता पर्यन्त पुजले  !
राज्यकरभाराचा भार एखाद्या श्रेष्ठ , धुरंधर राजकारण्या सारखा पेलला  …! सासु गोपिकाबाइंच्या मार्गदर्शनाखाली त्यानी प्रजेची सेवा केली  ....!  त्यांची  अहिल्या कर्मयोगिनी ही ओळख मनोमन पटते  …! 

     थोडक्यात "संकलन " हे पुस्तक म्हणजे माहितीचा खजिना आहे  .!  अनेक अश्या माहिती आपल्याला नव्याने कळतात  !  अतिशय रंजक आणि तरीही उद्बोधक आणि संग्रहणीय माहिती या पुस्तकातून मिळते  !

 पुस्तकाचे  नांव :- "संकलन"
 लेखक  :- श्री  .  बा।  जोशी (लेखक कलकत्ता राष्ट्रिय ग्रंथालयाचे ग्रंथपाल होते  .  )


                                                                                                          समिधा 

वृत्तपत्रीय भविष्याकडे

     
             सकाळी वृत्तपत्र हातात पडल्यावर हेडिंग नंतर भविष्याकडेच मोर्चा वळतो  …!

     वृत्तपत्रीय भविष्य कथनातही बरी हुशारी बरतलेली असते  ....! म्हणजे भविष्य सांगताना अगदी ठामपणे काहीच दर्शविलेले नसते … ! उदा  . मौन पाळावे ,  समयोचित वागा  , वाद टाळा   … इ  . मग अश्या वेळी खरच भविष्य वाचना-यांची पंचाईतच होते  …!

      समयोजित वागा ,  वाद टाळा यामधून नेमके कधी , कसे , कोठे आणि कशा त-हेने वागावे , बोलावे कसे कळणार  …?? 

          स्व:तावरील विश्वास डळमळीत झाला की  माणूस "सुपरस्टीशियस " होऊ  लागतो  …! आणि मग तो या लाचारीमुळे एकतर कमालीचा धार्मिक बनतो किंवा रोजच्या वृत्तपत्रीय भविष्याकडे वळतो  …! 

                                                                                                  समिधा 

लोकप्रिय ..........

एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

       किती किती अवघड असते समजून घेणे  एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं    ....!!  अगदी अनपेक्षित असते  आपल्या साठी   …!  काळाने गनिमिका...

हे तुम्हाला नक्की आवडेल......